Maharashtra News https://www.maharashtra.city Fri, 03 May 2024 14:50:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 विकलेला आमदार, खासदार आम्ही का स्वीकारावा? – सुषमा अंधारे यांचा सवाल https://www.maharashtra.city/cities/raigad/should-we-accept-defeated-and-special-representatives-question-raised-by-sushma-andhare/ https://www.maharashtra.city/cities/raigad/should-we-accept-defeated-and-special-representatives-question-raised-by-sushma-andhare/#respond Fri, 03 May 2024 14:50:18 +0000 https://www.maharashtra.city/?p=17467 महाड: रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये सुषमा अंधारे आणि सुभान अली शेख यांनी नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर तोंडसुख घेतले. ज्या तटकरेंना शरद पवार यांनी मोठे केले आणि ज्या भरत गोगावले यांना बाळासाहेब ठाकरे यांनी सन्मान दिला, अशा तटकरे आणि गोगावले यांनी गद्दारी केली, हीच गद्दारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत देखील होऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली

अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपिठावर शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, माजी विरोधी पक्ष नेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे, दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना प्रवक्ते धनंजय देशमुख, हनुमंत नाना जगताप, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे, तालुकाप्रमुख आशिष पळसकर, दक्षिण रायगड वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे, राजेंद्र कोरपे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांनीच तटकरे आणि गोगावले या दोघांच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. ज्या पद्धतीने शरद पवार यांना सुनील तटकरे यांनी दगा दिला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी भरत गोगावले यांनी गद्दारी केली, त्याप्रमाणे हे दोघे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी गद्दारी करणार नाहीत का? याची काय गॅरंटी असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

आपल्या भाषणामध्ये सुभान अली शेख यांनी तटकरेंच्या रक्तात गद्दारी आहे, अशी टीका करत तटकरे हे अजित पवार यांना देखील दगा देतील, असा संशय व्यक्त केला. गद्दारी करणाऱ्यांना रायगड कदापी माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपने मराठी अस्मिता जपणारे पक्ष फोडले आहेत. गोगावले यांना सगळ्यात जास्त त्रास सुनील तटकरे यांनी दिला आहे. गोगावले यांच्या मंत्रीपदामध्ये मोठा अडथळा आणणारे हेच सुनील तटकरे आहेत, तरीही त्याच तटकरेंच्या प्रचाराला गोगावले जिवाचं रान करत आहेत. मंत्रिपद देऊ दिलं नाही. कुकर्म लपवण्यासाठी तटकरे भाजपसोबत गेले असा आरोप देखील सुभान अली यांनी केला.

तर सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टिकेची झोड उठवली. वातावरण फिरलय आणि जनतेनेच ठरवले आहे, हे पहिल्या दोन टप्प्यात दिसून आले आहे. यामुळेच भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. भरत गोगावले हा आमचा भाऊ आहे आणि त्यांचा सुपुत्र आमचा भाचा आहे, असे सांगून सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपा हिंदूची सावली आहे, मग मराठी माणसावर लाठीमार झाली ते हिंदू नव्हते का? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. मोदींना विकासावर बोलता येत नाहीत त्यामुळे त्यांनी जातीच्या भिंती उभ्या केल्या आहेत. धार्मिक चिथावणीखोर वक्तव्य करून गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या जाती-जाती तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने सुरू केली आहे.

सुषमा अंधारे यांनी देशातील भाजपच्या भक्तांना प्रश्न करून आम्ही विचारत असलेल्या फक्त नऊ प्रश्नांची उत्तरे त्यांनी देण्याचे आव्हान दिले. एकतरी स्मार्ट सिटी दाखवा, खासदार दत्तक आदर्श गाव योजना, नऊ जिल्हे सांगा ज्यात शंभर टक्के शौचालये आहे, नऊ राज्य सांगा ज्या राज्यात सलग शंभर किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे. जन धन खाते सांगा ज्यामध्ये पंधरा लाख जमा झालेत. नऊ राज्य सांगा ज्यात नव्याने वीज प्रकल्प उभे राहिलेत, नऊ मंत्री सांगा ज्यांची मुले सरकारी शाळेत शिकतात. भाजप नेते सांगा ज्यांच्या घरी ई डी ची धाड पडली. असे नऊ जिल्हे जिल्हे सांगा जिथे एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. सलग टप्पा दाखवा ज्यात गंगा स्वच्छ झाली आहे, नऊ जिल्हे सांगा शंभर टक्के सिंचन प्रकल्प पूर्ण झालेत. अशा नऊ प्रश्नांची उत्तरे भाजपच्या भक्तांनी द्यावीत.

रायगडच्या सुनील तटकरे यांच्या घरात सगळेच सत्तेत, मग रायगडकरानी काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेच्या निवडणुकीला पण मोदींना यावं लागत यातच त्यांचा पराभव दिसून येत आहे. फॅशनच्या दुनियेत गॅरंटी की बात नहीं होती. एकदा विकलेला माल परत घेतला जात नाही असे व्यापारी लिहून ठेवतो मग विकलेला आमदार, खासदार आम्ही का स्वीकारावा. संविधान बदलण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन केले जात आहे पण आम्हाला वन नेशन वन एज्युकेशन पाहिजे, पक्ष आणि चिन्हं चोरणारी टोळी आम्हाला नको. अशा खरपूस शब्दात. त्यांनी गोगावले व तटकरे यांचा समाचार घेतला.

]]>
https://www.maharashtra.city/cities/raigad/should-we-accept-defeated-and-special-representatives-question-raised-by-sushma-andhare/feed/ 0
कुस्तीपटू विजय चौधरीला पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह https://www.maharashtra.city/maharashta-news/wrestler-vijay-chaudhary-conferred-with-dgp-honour/ https://www.maharashtra.city/maharashta-news/wrestler-vijay-chaudhary-conferred-with-dgp-honour/#respond Sat, 27 Apr 2024 15:28:54 +0000 https://www.maharashtra.city/?p=17461 X: @maharashtracity

मुंबई: कुस्तीचा आखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलीसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलीस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ‘ जाहीर करण्यात आले आहे.

राज्य पोलीस विभागात विविध पदांवर कार्यरत असून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कर्तृत्ववान पोलीसांना महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह या प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅटट्रिक नोंदविणार्‍या विजय चौधरीने महाराष्ट्र पोलीस दलात दोनवेळा सुवर्ण पदक जिंकले. तसेच २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले होते.

भविष्यातील मोठ्या कुस्ती स्पर्धा तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव असेच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेणार असल्याचे विजय चौधरीने सांगितले. पोलीस खात्याचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विजयवर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व सन्मानचिन्ह विजेत्यांचे अभिनंदन केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जयजीत सिंह, निकेत कौशिक, विश्वास नांगरे पाटील, अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे विजय चौधरी पोलीस खात्यातही आपला दम घुमवू शकला आहे. सध्या विजय चौधरी आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.

]]>
https://www.maharashtra.city/maharashta-news/wrestler-vijay-chaudhary-conferred-with-dgp-honour/feed/ 0
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या दिमतीला देवेंद्र फडणवीस https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-lok-sabha-devendra-fadnavis-will-address-rally-for-ncp-candidate-sunil-tatkare/ https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-lok-sabha-devendra-fadnavis-will-address-rally-for-ncp-candidate-sunil-tatkare/#respond Wed, 24 Apr 2024 16:23:53 +0000 https://www.maharashtra.city/?p=17459 26 एप्रिल रोजी पेण मध्ये जाहीर सभा!

X: @maharashtracity

महाड: राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महायुती विरोधी महाविकास आघाडी असा जंगी सामना होत आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना मतदारसंघात होत असलेला विरोध पाहता त्यांच्या दिमतीला खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून 26 एप्रिल रोजी पेणमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

राज्यातील तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांमध्ये दुरंगी लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली असून या मतदारसंघातून यदाकदाचित तटकरेंचा पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात बॅकफुटवर जाईल अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांमध्ये चर्चिली जात आहे. त्यामुळे तटकरेंना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या सहकार्याने अजित पवार गट तयारीला लागला आहे.

या मतदारसंघात मुस्लिम, कुणबी आगरी -कोळी या समाजाच्या मतांवर विजयाचे गणित अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना या सर्व समाजातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. हे वास्तव सुनील तटकरे यांना माहित असले तरी नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तटकरेंवर नाराज आहेत. त्यातच पक्षात दोन गट पडल्याने मूळ राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नाहीत. रस्ते, रेल्वे औद्योगिकीकरण व बेरोजगार तरुणांचा प्रश्न, आगरी -कोळी बांधवांचा, मच्छीमार समाजाचा प्रश्न, धनगर वाड्यांचे प्रलंबित प्रश्न, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पंधरा वर्षापासून भिजत पडलेला प्रश्न, यामुळे रायगडकर व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूणमधील कोकणवासिय नाराज आहेत.

या सर्वांच्या विरोधाला डावलून तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी माजी खासदार अनंत गीते यांच्याशी त्यांना कडवी झुंज द्यावी लागत आहे

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मोरबा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पटाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुस्लिम बहुसंख्य समाज असलेल्या मोहल्ला मध्ये झालेल्या 23 एप्रिल रोजीच्या जाहीर सभेमुळे मुस्लिम समाज तटकरेंपासून दुरावल्याचे चित्र सभेनंतर निर्माण झाले आहे. मुस्लिम समाजाचा वाढता विरोध पाहता मुस्लिम समाजाला आश्वासन देण्यासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या दिमतीला धावून आले असून त्यासाठी त्यांनी पेण येथे शुक्रवारी 26 एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित केली आहे.

या सभेनंतर मतदारसंघातील गणित बदलते का याची चाचपणी देखील होणार आहे.

]]>
https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-lok-sabha-devendra-fadnavis-will-address-rally-for-ncp-candidate-sunil-tatkare/feed/ 0
रायगड रोपवे ने बसवली चौथी ट्रॉली; शिवभक्त व पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे ? https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-ropeway-installs-a-fourth-trolley-is-the-safety-of-shivaji-bhakta-and-tourists-in-danger/ https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-ropeway-installs-a-fourth-trolley-is-the-safety-of-shivaji-bhakta-and-tourists-in-danger/#respond Thu, 18 Apr 2024 16:17:12 +0000 https://www.maharashtra.city/?p=17445 X : @milindmane70

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर जाण्यासाठी अत्यंत कमी वेळेचा आणि सोपा असा मार्ग असलेला रायगड रोपवे प्रकल्पाच्या प्रशासनाने पुन्हा दोन ट्रॉलीसाठी मंजुरी असताना आधी तिसरी आणि आता चौथी ट्रॉली बसवली आहे.  या ट्रॉलीची चाचणी नुकतीच घेण्यात आली असली तरी हा प्रकार धोकादायक आहे. औद्योगिक सुरक्षा अधिनियम अंतर्गत सर्व यंत्रणांना धाब्यावर बसवून चौथ्या ट्रॉलीच्या केलेल्या चाचणी बाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

किल्ले रायगडावर जाण्यासाठी जोग इंजिनिअरिंग कंपनीने रायगड रोपवेची निर्मिती केली. पूर्वीपासून पायवाट असल्याने या मार्गाला सुरुवातीच्या काळात विरोध झाला होता. मात्र हा विरोध झूगारून शासनाने रोपवे प्रकल्पाला परवानगी दिली गेली.  सध्या रायगडवर जाण्यासाठी पायी मार्ग असला तरी आबालाबुद्ध आणि तरुण या रोपवेचा आनंद घेत आहेत. शैक्षणिक सहलीतील मुलांना सूट असल्याने ते देखील रोपवेनेच प्रवास करताना दिसतात. गेले वीस वर्षाहून अधिक काळापासून हा प्रकल्प शिवप्रेमी आणि पर्यटकांना रायगडावर जाण्या – येण्याची उत्तम सुविधा पुरवत आहे. गडावरील गर्दी पाहता सध्या अस्तित्वात असलेला रोपवे कमी पडू लागला. त्यामुळे आणखी एक अद्ययावत रोपवे उभा केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. 

राज्य शासनासह केंद्र शासनाने देखील त्याला दुजोरा दिला. मात्र नवीन प्रकल्पाची चर्चा सुरू होत असतानाच रायगड रोपवे ने प्रशासनाची परवानगी न घेता या ठिकाणी तिसरी ट्रॉली बसवल्याची चर्चा रायगड परिसरातील गावांमध्ये होती. 

रायगड रोपवे जवळील हिरकणी वाडी येथील जमिनींना पडणाऱ्या भेगा आणि होणारे भूस्खलन यामुळे रायगड रोपे परिसरात धोका निर्माण झाला होता. मात्र सत्ताधारी आणि रोपवे प्रशासन यांच्या संगनमताने याठिकाणी नियम, अटी झुगारून विविध परवानग्या देण्यात आल्या. आता नव्याने रायगड रोपवे प्रशासनाने दोन ट्रॉली असताना तिसरी व नंतर चौथी ट्रॉली बसवण्याचे काम कोणत्या अधिनियमाखाली केले? ते करत असताना याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या का? या सर्व नियमांना हरताळ फासण्याचे काम रायगड रोपवे प्राधिकरणाने केले असल्याचा आरोप केला जात आहे. 

रायगड रोपवे ने या चौथ्या ट्रॉलीची नुकतीच चाचणी घेतली. अजून काही चाचण्या घेण्यात येणार आहेत आणि यशस्वी चाचणी झाल्यानंतर तीचे लोकार्पण केले जाईल, असे रायगड रोपवे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या ट्रॉलीत ४ प्रवासीच बसविले जात आहेत. २३ तारखेला शिवपुण्यतिथी दिनी लोकार्पण सोहळा करुन नंतर रीतसर ती सुरू केली जाईल अशी शक्यता आहे. सध्या असलेल्या रोपवे करिता प्रत्येकी ३१० रू रिटर्न तर सिंगल मार्ग तिकीट २००/- रूपये आकारले जाते. जेष्ठ नागरिकांसाठी रिटर्न तिकीट २०० रुपये, ३ वर्षापेक्षा लहान मुलांना मोफत, वय वर्षे ३ व ४ मधील मुलांना तिकिट २००/- रूपये, ४ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना पूर्ण तिकीट, दिव्यांगांना मोफत,शालेय  विद्यार्धी १ ते ७ पर्यंत रिटर्न १९०/- रुपये,  सिंगल १३०/-. ८ ते १२ पर्यंत २२५/- रिटर्न, सिंगल १९०/- असे तिकीट आकारले जात आहे.

नवीन शासकीय रोपवे प्रकल्प गुंडाळला का ?

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, शिव पुण्यतिथी, शिवजयंती असे अनेक कार्यक्रम मोठ्या गर्दीमध्ये साजरे होतात. या वेळेला गर्दीचा उच्चांक मोडला जातो. यावेळी रायगड रोपवे ला चार ते पाच तासाची प्रतीक्षा असते, यामुळे अनेकांना रायगड न पाहताच परतावे लागते. याकरता नवीन शासकीय रोपवे उभा केला जावा, अशी मागणी पुढे आली होती. तसेच रायगड रोपवेच्या मनमानी कारभारामुळे व पर्यटकांना कोणतीही सोयी सुविधा न पुरवणाऱ्या रायगड रोपवेच्या गैरकारभारामुळे या ठिकाणी नवीन रोपवे, तो देखील पर्यटन विभागाच्या अधिपत्याखाली असावा, अशी मागणी वारंवार जोर धरू लागली आहे. त्यासाठी शासनाने जागेची पाहणी देखील केली होती. मात्र हा प्रकल्प गुंडाळण्याऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या रायगड रोपवे प्रशासनाकडून रोपवेमध्येच मनमानी पद्धतीने बदल केले जात आहेत.

रायगड रोपवेच्या मनमानी कारभाराबाबत युवराज संभाजी राजे भोसले यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. नवीन शासकीय रोपवे व्हावा, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली होती. रोपवे प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी पत्र व्यवहार देखील केला होता. मात्र संभाजी राजे भोसले सत्तेत सामील झाल्यानंतर ही मागणी थांबली होती. आता चार ट्रॉली बसवल्यानंतर माजी खासदार युवराज संभाजी राजे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

किल्ले रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांची व शिवभक्तांची दररोज वाढती संख्या पाहता व देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी केंद्र शासनाने पर्यटन खात्याअंतर्गत अत्याधुनिक पद्धतीचा नवीन रोपवे उभारावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  याबाबत केंद्र शासनाने तातडीने प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी लाखो शिवभक्त व देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडून रायगड रोपवेच्या परिसरात ऐकण्यास मिळत आहे. रायगड रोपवे च्या मनमानी कारभाराला असंख्य पर्यटक व लाखो शिवभक्त त्रस्त झाले असून राज्य शासनाने तातडीने मार्ग काढून नवीन रोपे ची निर्मिती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

]]>
https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-ropeway-installs-a-fourth-trolley-is-the-safety-of-shivaji-bhakta-and-tourists-in-danger/feed/ 0
प्रमुख अभियंता पदावर पदोन्नती करताना ज्येष्ठ अभियंत्यांना डावलण्यात आल्याने न्यायालयात धाव  https://www.maharashtra.city/cities/mumbai/senior-engineers-approaches-court-as-they-were-left-out-while-being-promoted-to-the-post-of-chief-engineer/ https://www.maharashtra.city/cities/mumbai/senior-engineers-approaches-court-as-they-were-left-out-while-being-promoted-to-the-post-of-chief-engineer/#respond Wed, 17 Apr 2024 16:05:41 +0000 https://www.maharashtra.city/?p=17438 X: @maharashtracity

मुंबई: महापालिका प्रशासनाने प्रमुख अभियंता ( स्थापत्य ) या पदावर पदोन्नती करताना नगर अभियंता खात्याने तयार केलेल्या सुधारित सेवा ज्येष्ठता यादीवर कोणत्याही हरकती सूचना न मागवता आणि सुनावणी न घेता ही यादी अंतिम करण्यात आल्याने ज्येष्ठ अभियंत्यांची नावे वगळण्यात आल्याच्या विरोधात उपप्रमुख अभियंता विभास आचरेकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 

पालिका प्रशासनाने प्रमुख अभियंता  ( स्थापत्य ) या पदावर पदोन्नती करताना दुय्यम अभियंता  ( स्थापत्य ) पदाची १९९० ते २००० सालापर्यंतची सेवा ज्येष्ठता यादी ३० वर्षानंतर नगर अभियंता खात्याने सुधारित केली होती. ही नवीन यादी जानेवारी २०२४ मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र सुधारित सेवा ज्येष्ठता यादीवर कोणत्याही हरकती सूचना न मागवता आणि सुनावणी न घेता ही यादी अंतिम करण्यात आली. 

याचा परिणाम असा झाला की, यापूर्वी सेवाज्येष्ठता यादीत ज्या सेवा ज्येष्ठता अभियंत्यांची नावे होती, ती नावे वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे. या यादीतून उपप्रमुख अभियंता विभास आचरेकर यांना डावलण्यात आले आहे. याविरोधात आचरेकर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 

दरम्यान, प्रमुख अभियंता पदाच्या सुधारित सेवा ज्येष्ठता यादीत ज्येष्ठ अभियंत्यांना डावलून १० कनिष्ठ अभियंत्यांचा या यादीत समावेश करण्यात आल्याचा ही आरोप होत आहे. 

]]>
https://www.maharashtra.city/cities/mumbai/senior-engineers-approaches-court-as-they-were-left-out-while-being-promoted-to-the-post-of-chief-engineer/feed/ 0
सुनील तटकरेंना २०१९ मध्ये दिलेल्या आश्वासनांचा विसर https://www.maharashtra.city/cities/raigad/mp-sunil-tatkare-forgot-to-fulfill-poll-promises-given-during-2019-ls-polls/ https://www.maharashtra.city/cities/raigad/mp-sunil-tatkare-forgot-to-fulfill-poll-promises-given-during-2019-ls-polls/#respond Wed, 17 Apr 2024 16:01:26 +0000 https://www.maharashtra.city/?p=17436 X: @maharashtracity

ना महामार्ग पूर्ण, ना महाडमध्ये औद्योगिक विकास

मुंबई: रायगड लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे खासदार व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवडणुकीत दिलेल्या  वचनांचा विसर पडला आहे. त्या आश्वासनांचे काय झाले? असा सवाल ग्रामीण भागातील जनता तटकरे यांना विचारत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेले व काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आर.पी.आय (गवई गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचा पाठिंबा घेऊन २०१९ मध्ये विजयी झालेले खासदार सुनील तटकरे यांनी या लोकसभा मतदारसंघातील जनतेला जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण केली असा प्रश्न मागील जाहीरनाम्याचे चित्र बघितल्यावर स्पष्ट होते. 

सुनील तटकरे यांनी त्यावेळी एक संकल्पपत्र प्रसिद्ध केले होते. या संकल्प पत्रात तटकरे यांनी नमूद केले होते की, “मुंबई लगत असणाऱ्या रायगडमध्ये विकासाच्या अगणित संधी आहेत. मुंबईसाठीचे सेवा पुरवठा केंद्र, पर्यटनासाठीचे हब, सर्वोत्कृष्ट दर्जाची शिक्षण व आरोग्य व्यवस्था, यासाठीचे केंद्र बनण्याची रायगडची क्षमता आहे. ही क्षमता विकसित करण्याची आवश्यकता आहे. दूरदृष्टी धोरणांचा पाठपुरावा करण्याचा माझा तुम्हाला शब्द आहे.” 

आपल्या मतदारसंघात पुढील पाच वर्षात अमुलाग्र बदल दिसेल, असे आश्वासन देणाऱ्या तटकरेंनी खरंच आमुलाग्र बदल केला का याचे उत्तर तटकरेंनीच जाहीर केलेल्या संकल्प पत्राचे वाचन केल्यानंतर दिसून येईल. तटकरे यांनी महाडमध्ये जनतेच्या सुविधेसाठी खासदारांचे अद्ययावत कार्यालय असेल असे जाहीर केले होते. मात्र दुसरी निवडणूक आली तरी खासदारांचे कार्यालय महाडमध्ये झाले नाही आणि खासदारांच्या भेटीसाठी नागरिकांना सुतारवाडीच्या फेऱ्या माराव्या लागल्या. अशी अनेक वचने तटकरे यांनी महाडकरांना दिली होती. 

महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी उद्योग व्यवसाय आणून या औद्योगिक क्षेत्राला लागलेला रासायनिक प्रकल्पांचा डाग पुसून टाकण्याची भाषा देखील तटकरे यांनी केली होती. महाडजवळ असलेल्या वीर रेल्वे स्थानकाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी देखील अनेकदा तटकरे यांच्याकडे करण्यात आली. याची पूर्तता करण्यासाठी तटकरे यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. 

महाडजवळ असलेल्या लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात संपूर्ण देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी या ठिकाणी आजही अनेक पद रिक्त आहेत. या ठिकाणी शेकडो एकर जमीन पडीक असल्याने अनेक वैविध्यपूर्ण कोर्स येणे आवश्यक होते, मात्र याबाबत देखील त्यांनी कधीही लक्ष दिलेले नाही.

खासदार सुनील तटकरे यांच्या जाहीरनाम्यातल्या ठळक गोष्टी पुढील प्रमाणे

(1) मुंबई – गोवा चौपदरी महामार्गाचे काम  प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल,

(2) आपला कोकण हा मुंबईला लागून असल्यामुळे उद्योग विस्तारासाठी मोठा वाव, या दृष्टीने मास्टर प्लॅन आखण्यात येईल,

(3) मुंबईतील व्यवसायाचे सेवा पुरवठा केंद्र म्हणून रायगड विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहू,

(4) रखडलेला सागरी महामार्ग पूर्ण करून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा आणि त्यास बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव देण्याची मागणी केलेली आहे,

(5) आपल्या कोकण भागासाठी स्वतंत्र प्रदूषण विरहित उद्योग धोरण आखण्याचा आग्रह धरण्यात येईल,

(6) कोकणातील गावांमध्ये पोहोचण्यासाठी पुलाचे महत्व अनन्य साधारण आहे. रायगड मतदार संघातील अपूर्ण राहिलेले आणि नव्याने आवश्यक असे सर्व पूल बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला जाईल,

(7) कोकणामध्ये आंबा, काजू प्रक्रिया उद्योग क्लस्टर स्थापन करण्याचा आग्रह धरणार,

(8)  रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी अद्ययावत, सुरक्षित आणि गतिमान तंत्रज्ञानाचा वापर करणारे रोप वे वापरण्यात येतील,

(9)  मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या दापोलीत चांगल्या प्रतीचे रस्ते विकास करण्याला प्राधान्य राहील व पर्यटन वृद्धीसाठी  सर्वकश प्रयत्न राहील,

(10)  कोकणातील पर्यटन विकास हा पर्यावरण पूरक असेल यावर कटाक्ष राहील,

(11) प्रत्येक सरकारी शाळेत डिजिटल स्मार्ट क्लासरूम स्थापन करण्यात येतील,

(12) लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अभ्यासासाठी स्थानिक पातळीवर लोकसेवा आयोग अभ्यास केंद्र उभारण्यावर तसेच मरीन इंजीनियरिंग व नौदल अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण वर्ग चालवले जातील,

(13) रायगडमधील सर्व नगरपरिषदांमध्ये मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारले जावेत यासाठी उद्योजकांना सहकार्याचे आवाहन करणार,

(14) जहाज बांधणी, जहाज जोडणी यासाठीचे प्रशिक्षित मनुष्यबळ कोकणातच उपलब्ध होण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हाती घेतले जाईल,

(15) किनारपट्टी नजीक वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे समुद्राच्या लाटांच्या माऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठीचा किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा,

(16) पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर देण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल, दळणवळणाच्या सुविधा भक्कम करणे वॉटर स्पोर्ट, साहसी खेळांच्या सुविधा विकसित करण्यावर आणि घरगुती निवास व्यवस्थेला चालना देण्यावर भर दिला जाईल

(17) रोहा व दापोली येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येईल

(18) रायगड जिल्ह्यात बहुजन समाजाच्या बेधखल कुळांचे प्रश्न जातीचे दाखले इत्यादी समस्या प्राधान्याने सोडविणार.

याच बरोबर रायगडमधील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्यावरण समृद्ध गावासाठीचे निकष पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल खासदार निधीचा बहुतांश वापर यासाठी केला जाईल,. रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आणि गावाचा विकास आराखडा तयार करून विकास कामे हाती घेतली जातील, हरित, स्वच्छ व तंत्रज्ञान युक्त रायगड हे माझे उद्दिष्ट आहे. तसेच रायगडमधील सर्व गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जातील व जागतिक तापमान वाढीच्या दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवणे तसेच सर्व तालुक्यांच्या ठिकाणी युथ होस्टेलची उभारणी यासाठी खासदार निधीचा बहुतांश वापर केला जाईल व मुंबई ते अलिबाग या नवीन उपनगरी रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करणार, अशी आश्वासने तटकरे यांनी जनतेला दिली होती. त्यापैकी किती आश्वासनांची पूर्तता मागील पाच वर्षात तटकरे यांच्याकडून करण्यात आली? का असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

]]>
https://www.maharashtra.city/cities/raigad/mp-sunil-tatkare-forgot-to-fulfill-poll-promises-given-during-2019-ls-polls/feed/ 0
वाढत्या तापमानामुळे रायगड मतदारसंघात कमी मतदानाची शक्यता? https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-lok-sabha-voting-percent-is-expected-to-be-low-due-to-heatwave/ https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-lok-sabha-voting-percent-is-expected-to-be-low-due-to-heatwave/#respond Wed, 17 Apr 2024 15:57:34 +0000 https://www.maharashtra.city/?p=17434 X: @maharashtracity

महाड: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा पारा आधीच 43 ते 45 डिग्री तापमानापर्यंत पोहोचला असल्याने मतदान करून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

पूर्वीच्या कुलाबा या मतदारसंघात 1989 च्या लोकसभा निवडणुकीत ६६.२ टक्के मतदान झाले होते, त्यानंतरच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी यापेक्षा कमी असल्याने यंदाच्या निवडणुकीत 1989 ची पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे.

सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा,  रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत आहे.  या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाढत्या तापमानाने हाहाकार माजविला आहे. त्यातच पाणीटंचाईची ही तीव्रता मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यात उष्णतेचा पारा 43 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे सकाळी नऊच्या आधीच सर्वसामान्य नागरिक आपली कामे उरकून घरातच बसतात. त्यातच एप्रिल महिन्यापेक्षा मे महिना हा तीव्र उष्णतेचा असल्याने या काळात उष्णतेच्या तीव्रतेवर  मतदानाची टक्केवारी अवलंबून असेल.

मतदानची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वच पक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्यांबरोबरच शीतपेय व आईस्क्रीम यासोबत वातानुकूलित गाडीतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात सन 1977 मध्ये 61.68% मतदान झाले होते. त्यानंतर 1980 मध्ये 63.5 %, 1984 मध्ये 64.43 %,  1989 मध्ये 66.2 % ,1991 मध्ये 51.93 %, 1996 मध्ये 57.68 %, 1998 मध्ये 57.79 %, 2004 मध्ये 61.32 %, २००९ मध्ये 56.27 %, 2014 मध्ये 64.47 % तर 2019 च्या निवडणुकीत 61.81%  मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली होती.

आतापर्यंतच्या मतदान टक्केवारीच्या नोंदीनुसार 1989 मध्ये झालेल्या 66.2% टक्केवारीचा विक्रम कायम असल्याने याची पुनरावृत्ती २०२४ मध्ये होणार का? असा सवाल सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता साधारणपणे 62 % पेक्षा जास्त मतदान होणार नाही, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.

]]>
https://www.maharashtra.city/cities/raigad/raigad-lok-sabha-voting-percent-is-expected-to-be-low-due-to-heatwave/feed/ 0
अग्निशमन दलाच्या वाहनांना लागणाऱ्या आगीची चौकशी करुन अहवाल सादर करा – उपायुक्तांनी दिले आदेश https://www.maharashtra.city/cities/mumbai/investigate-and-submit-a-report-on-fires-involving-fire-brigade-vehicles-deputy-commissioner-orders/ https://www.maharashtra.city/cities/mumbai/investigate-and-submit-a-report-on-fires-involving-fire-brigade-vehicles-deputy-commissioner-orders/#respond Tue, 16 Apr 2024 14:44:38 +0000 https://www.maharashtra.city/?p=17432 X : @Rav2Sachin

मुंबई : मुंबई अग्निशमन दलातर्फे आग विझविण्याचे काम केले जात असेल तरी सद्या घटनास्थळी फायर इंजिनलाच आग लागण्याच्या घटना घडत आहे. या गंभीर घटनेची दखल घेत यासंबंधी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

अलिकडेच वडाळा फायर स्टेशनचे फायर इंजिन MP – ३३ ही गाडी भायखळा वर्कशॉप येथून वडाळा आरटीओ येथे पासिंग करायला जात असताना पूर्व द्रुतगती मार्गावर अचानक पेट घेतला होता. त्यापाठोपाठ सांताक्रुझ स्मशानभूमीमध्ये आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अंधेरी फायर स्टेशनमधील फायर इंजिन आग विझवण्यासाठी रवाना झाली. स्मशानभूमीच्या लाकडांना आग लागली होती. आग विझवत असताना फायर इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तोवर अग्निशमन जवानांनी आगीवर थोडे नियंत्रण मिळवले होते. पण फायर इंजिनमधून धूर येत असल्याने जवानांनी आग विझवणे बंद केले. तितक्यात फायर इंजिनमध्ये एक स्फोट झाला आणि आग लागली. सुदैवाने वांद्रे फायर स्टेशनची फायर इंजिन घटनास्थळी होती. या फायर इंजिनने आग विझविली तसेच स्मशान भूमीच्या लाकडांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या दोन्ही घटनेची गंभीर घेत शुक्रवारी उपायुक्त प्रशांत गायकवाड यांनी आपल्या दालनात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. बैठकीत उपायुक्त गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फायर इंजिनला आग का लागत आहे, याविषयी विचारणा करत या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंबंधी चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले. 

अग्निशमन दलाचे काम हे आग विझविण्याचे आहे. पण आग विझविणाऱ्या फायर इंजिनलाच आग लागण्याच्या घटना घडणे अत्यंत गंभीर आहे. याकरिता योग्य ते पाऊल उचलणे महत्वाचे असल्याने यासंबंधी चौकशी करुन अहवाल सादर करण्यास उपायुक्त गायकवाड यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, “तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सांभाळतो वाहनांची जबाबदारी!”

https://www.maharashtra.city/breaking-news/mumbai-news-non-technical-deputy-chief-fire-officer-is-in-charge-of-the-vehicles/) या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमी द्वारे अग्निशमन दलाचे वाहने व्यवस्थित न पडताळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून मुंबईकरांच्या जीवाला धोका ही होऊ शकतो, ही बाब उजेडात आणली होती. ही बाब आता खरी ठरु लागली आहे.

]]>
https://www.maharashtra.city/cities/mumbai/investigate-and-submit-a-report-on-fires-involving-fire-brigade-vehicles-deputy-commissioner-orders/feed/ 0
अनधिकृत वाळूच्या बार्जेसमुळे आंबेत पुलाला धोका! https://www.maharashtra.city/cities/raigad/mahad-ambet-bridge-is-in-danger-due-to-the-transportation-of-barjes-carrying-sand/ https://www.maharashtra.city/cities/raigad/mahad-ambet-bridge-is-in-danger-due-to-the-transportation-of-barjes-carrying-sand/#respond Wed, 10 Apr 2024 14:19:50 +0000 https://www.maharashtra.city/?p=17425 X: @maharashtracity

महाड: रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाखालून वाळूच्या अनधिकृत बार्जच्या वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलाखालून अनधिकृत बार्जची वाहतूक बंद करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. असे असतानाही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे ही वाहतूक अशीच सुरू आहे.  आंबेत पुलाची स्थिती धोकादायक  झाली असून हा पूल कोसळण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकत ईसाने यांनी राज्य सरकारला याबाबत लेखी पत्र पाठवून अवगत केले असून या पुलाखालून अनधिकृत बार्जची  वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकिर्दीत झाला होता. मात्र या पुलाखालून अनधिकृतरित्या वाळूच्या बार्जेसमधून वाहतूक चालू असताना या पुलाच्या पाच नंबरच्या पिलरला धक्का लागून पुलाचा काही भाग कमकुवत झाल्याने मागील अडीच वर्ष या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.

आंबेत पुलाखालून अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जेसची वाहतूक बंद करा – सामाजिक कार्यकर्ते शौकत ईसाने यांची मागणी

या पुलाच्या डागडुजीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने तब्बल 22 कोटी रुपये खर्च केले. त्या अडीच वर्षाच्या काळात दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांची सोय व्हावी व हलक्या वाहनांसह मोठ्या वाहनांना दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत जाण्याची सोय व्हावी, यासाठी रोरो सेवेमार्फत आंबेत खाडीतून वाहतूक चालू होती. या वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रोरोसेवेधारकाला तब्बल 80 लाख रुपये दर महिन्याला अदा केले.

पुलाच्या दुरुस्तीवर आणि रोरो सेवेवर करण्यात आलेला खर्च पाहता या ठिकाणी नवीन पूल बांधून झाला असता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या कुठल्याही खर्चाचा अंदाज न घेता जुन्या पुलाची डागडुजी केली. मात्र त्यानंतर पुलाखालून रेतीने भरलेले अवजड बार्जची वाहतूक खुलेआमपणे चालू ठेवण्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कारणीभूत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकत ईशाने यांचे म्हणणे आहे.

वाळूच्या अवजड बार्जेसच्या वाहतुकीमुळे हा पूल कोणत्याही क्षणी बार्जेसच्या धक्क्यामुळे पडल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील? असा प्रश्न शौकत ईशाने यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे, महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्याकडे तसेच रायगड जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. मात्र या आंबेत पुलाच्या नदीपात्रातून दोन हजार टन ब्रास भरलेले बार्जेस अनधिकृतरित्या चालू असल्याने या पुलाला या बार्जेसच्या वाहतुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो.

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बानापुरे महाडच्या प्रांताधिकार्‍यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे. या पुलाखालून वाहतूक बंद करण्याची मागणी माणगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी देखील केली आहे. याबाबतचे पत्र महाडच्या प्रांताधिकार्‍यांना देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आंबेत पुलाची स्थिती धोकादायक झाली आहे.

]]>
https://www.maharashtra.city/cities/raigad/mahad-ambet-bridge-is-in-danger-due-to-the-transportation-of-barjes-carrying-sand/feed/ 0
आमदार भरत गोगावलेंची धमकी; कंटाळून पिंपळवाडी उपसरपंचाचे इच्छा मृत्यूसाठी राष्ट्रपतींना पत्र https://www.maharashtra.city/cities/raigad/mahad-deputy-sarpanch-requested-president-to-allow-him-to-commit-suicide/ https://www.maharashtra.city/cities/raigad/mahad-deputy-sarpanch-requested-president-to-allow-him-to-commit-suicide/#respond Mon, 08 Apr 2024 12:11:55 +0000 https://www.maharashtra.city/?p=17422 X: @maharashtracity

पिंपळवाडी उपसरपंचाचे आमदार गोगावलेंवर गंभीर आरोप!

महाड: आमदार भरत गोगावले यांचा पिंपळवाडी ग्रामपंचायत कामामधील हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून जीवितास असणारा धोका याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला वारंवार कळवून देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर पिंपळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी राष्ट्रपतीकडे इच्छा मृत्यूची मागणी पत्राद्वारे केली आहे. याबाबत देखील निर्णय झाला नाही तर आपण आपल्या कुटुंबासह गोगावले यांच्या खरवली ढालकाटी येथील घरासमोर ७ जून २०२४ रोजी आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे.

या प्रकारामुळे गेले अनेक दिवस गोगावले आणि त्यांच्या समर्थकांची सुरू असलेली मनमानी आणि गुंडगिरीची चर्चा पुराव्यासह समोर आली आहे.

महाड तालुक्यातील पिंपळवाडी या गावचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी ग्रामपंचायतीमधील सुरू असलेल्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवल्यानंतर आमदार गोगावले आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कल्पेश पांगारे यांना धमकी देण्याचे सत्र सुरू केले. यापूर्वी देखील त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार करण्यात आला होता, याबाबत कल्पेश पांगारे यांनी विविध स्तरावर तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारींची दखल आमदारांच्या दबावामुळे घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप पांगारे यांनी केला.

याबाबत सविस्तर पाढाच कल्पेश पांगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला. पिंपळवाडी हे गाव आमदार गोगावले यांचे मूळ गाव आहे. या गावामध्ये त्यांचे घर असले तरी ते गावातील मतदार नाहीत, मात्र ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यांचा सतत हस्तक्षेप सुरू आहे, asa दावा पांगारे यांनी केला. te म्हणाले, ग्रामपंचायतीमधील बेकायदेशीर कामाच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी आमदार गोगावले यांच्या समर्थकांनी संपूर्ण कुटुंबाला गंभीररीत्या मारहाण केली होती व गावातील इतर लोकांवर खोटे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. ही बाब इथेच थांबली नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

पिंपळवाडी गाव हे आमदार गोगावले यांचे असल्याने आमदार गोगावले यांनाच मतदान करा अन्यथा वाळीत टाकू अशी धमकी दिली जाते, त्यांचे हस्तक गुंड घरोघर जाऊन जीवे मारण्याची धमकी देतात, असा गंभीर आरोप पांगारे यांनी यावेळी केला आहे.

उपसरपंच कल्पेश वंदना बाबू पांगारे हे तरुण आणि शिक्षित आहेत. पिंपळवाडी गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या भ्रष्ट कामाबाबत त्यांना कायमचीड आहे. यामुळे त्यांनी कायम याबाबत आवाज उठवला. मात्र त्यांचा आवाज दाबण्यासाठी आमदार गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी सत्र सुरू करण्यात आले. या धमक्यांना कंटाळून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला होता. या प्रवेशाचा राग देखील मनात धरून गावातील लोकांना भडकावण्यात आले आणि उपसरपंच पदाचा राजीनामा मागण्यात आला. जे या ग्रामपंचायतीचे मतदारच नाहीत त्यांना राजीनामा मागण्याचा काय अधिकार? असा सवाल देखील कल्पेश पांगारे यांनी उपस्थित केला आहे.

आमदार गोगावले यांच्या गुंडगिरीने मरण्यापेक्षा राष्ट्रपतींनी इच्छा मरण द्यावे, अशी मागणी त्यांनी १६ मार्च २०२४ रोजी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केल्याचे देखील पांगारे यांनी सांगितले. प्रशासन दबावाखाली असल्याने ते याबाबत कोणतीच कारवाई करत नाही, यापुढे जर कारवाई झाली नाही तर आपण ७ जून २०२४ ya दिवशी आमदार गोगावले यांच्या खरवली ग्रामपंचायतमधील ढालकाटी येथील घरासमोरच कुटुंबासह आत्मदहन करू, असा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे.

पिंपळवाडी गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम सुरू असताना शाळेच्या जुन्याच विटा पुन्हा वापरण्यात आल्या होत्या. याबाबत आपण लेखी तक्रार केली होती. मात्र तू तक्रार करणारा कोण असा जाब विचारून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, असे उपसरपंच पांगारे यांनी सांगून २४/३/२०२४ रोजी पिंपळवाडी गावदेवी मंदिरात ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये आमदार गोगावले यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देत उद्याच्या उद्या उपसरपंच पदाचा राजीनामा दे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशी धमकी दिली होती, असा दावा पांगारे यांनी केला. याबाबतचे कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल चित्रफीत, व्हाईस रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा देखील पांगारे यांनी केला आहे.

पांगारे यांनी केलेल्या दाव्यामुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणा आता कोणती कारवाई करते याबाबत राजकीय निरीक्षकांकडून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

]]>
https://www.maharashtra.city/cities/raigad/mahad-deputy-sarpanch-requested-president-to-allow-him-to-commit-suicide/feed/ 0