@maharashtracity

मुंबई: मुंबईत लस उत्पादक कंपनीकडून लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लसीचा तुटवडा (shortage of vaccine) निर्माण झाला आहे. लसीच्या साठ्याअभावी १२ व १३ ऑगस्ट रोजी दोन दिवस मुंबईतील शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रे (BMC vaccination centres) बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

राज्य शासनाने एकीकडे १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्राच्या व आधारकार्डच्या साहाय्याने रेल्वे पास देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यास मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आता लसीच्या दोन डोससाठी नागरिक गर्दी करू लागले असताना पुन्हा एकदा लसीच्या साठ्याअभावी पालिकेने शासकीय व पालिकेची लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान,१२ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण १३ ऑगस्ट रोजी मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी लसीकरण पुन्हा सुरु होईल.

मात्र, लसीचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here