@maharashtracity

मुंबई: मुंबई शहर भागात अखंडित वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट वीज (BEST electric supply) विभागाच्या यंत्रणेत मंगळवारी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने माझगाव (Mazgaon) परिसरात तब्बल दीड तास ‘बत्तीगुल’ झाल्याने गरमीच्या दिवसात नागरिकांचे पंखे, एसी शिवाय काहीसे हाल झाले.

दीड तासाने वीज विभागातील तज्ज्ञांच्या पथकाने तांत्रिक बिघाड दूर करून वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे माझगावकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here