@maharashtracity

३ कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस

मुंबई: राज्यात लसीकरणाचे (vaccination) कोटी उड्डाणे होत असून आतापर्यंत लस लाभार्थ्यांमध्ये देशात महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याचे सोमवारच्या लसीकरण आकडेवारीने पुन्हा एकदा सिद्ध केले. राज्यात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम पुन्हा एकदा महाराष्ट्राने (Maharashtra) नोंदविला. तर ३ कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस घेतल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

एक कोटीहून अधिक नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याने त्यांचे  कोरोनापासून संरक्षण झाले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.  यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी कौतुक केले आहे.  

सोमवारी  सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. तर सोमवारच्या लसीकरणातून दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

राज्यात आज सुमारे ४१०० लसीकरण केंद्र सुरु असून  सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here