मुंबई: फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेस ने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. पद मिळणार नसेल तर सरकारचा पाठिंबा काढावा, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्याची तयारी असल्याची इच्छा नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here