@maharashtracity

धुळे: धुळे (Dhule) ग्रामीणचे आ. कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्या प्रयत्नाने मौजे लळींग येथे वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर पुल (पाईप मोरी) चे बांधकाम मंजुर करण्यात आले आहे.

आ.कुणाल पाटील यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन एकूण १० लक्ष रुपयाचा निधी मंजुर करून घेतला. या रस्त्यावर पुल नसल्याने अंत्ययात्रेच्यावेळी प्रचंड अडचण निर्माण होत असे. ही समस्या सुटावी म्हणून आ. कुणाल पाटील यांनी रस्त्यावर पुल (पाईप मोरी)चे बांधकाम मंजुर करुन दिले आहे. या कामामुळे नागरीकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

भूमीपुजन समारंभाप्रसंगी ज्येष्ठ नेते संभाजी गवळी, गरताड माजी सरपंच अरुण पाटील, गोविंद नागपुरे, भागोजी अंजिखाने, कैलास गठरी, धोंडू झिपरे, संतोष अंजिखाने, भटू झिपरे, संतोष गठरी, उपसरपंच अशोक गवळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here