@maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या व ते बेरोजगार झाले. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी परवानगी नसतानाही सामान्य नोकरवर्ग लोकलने रेल्वे प्रवास (local train) करतात आणि पकडले जातात. तर काही लोक जाणीवपुर्वक विना तिकिट प्रवास करतात.

असाच काहीसा प्रकार बेस्ट (BEST) उपक्रमाबाबत घडला आहे. जानेवारी २०२० ते मे २०२१ या कालावधीत बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या व प्रमाणित अंतरापेक्षाही जास्त प्रवास करणाऱ्या २० हजार २३४ फुकट्या प्रवाशांकडून १३ लाख २ हजार ३३४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रम अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. नव्हे , बेस्ट उपक्रम विशेषतः बेस्ट परिवहन विभाग व्हेंटिलेटरवर शेवटच्या घटका मोजत आहे. या बेस्टला मुंबई महापालिकेकडून ऑक्सिजनरुपी कर्ज व अनुदान यांचा पुरवठा सुरू असल्याने आतापर्यंत बेस्टचा श्वासोच्छ्वास सुरू आहे.

ज्या दिवशी बेस्टला बँका, मुंबई महापालिका यांच्याकडून कर्ज, अनुदान मिळणे बंद होईल, त्या दिवसापासून बेस्टचे ‘टायर पंक्चर’ होणार होतील. त्यामुळे बेस्टला जगण्यासाठी स्वतःचे भूखंड विक्रीला काढून बेस्टला काही दिवस जगवता येईल.

त्यातच, बेस्टला गेल्या मार्च २०२० पासून ते आजपर्यंत कोरोनाचा चांगलाच आर्थिक फटका बसलेला आहे. त्यातून सावरण्यासाठी बेस्टला मुंबई महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. मात्र या कोरोना कालावधीतच बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या व प्रमाणित अंतरापेक्षाही जास्त प्रवास करणाऱ्या २० हजार २३४ फुकट्या प्रवाशांकडून १३ लाख २ हजार ३३४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जे विना तिकीट पकडले गेले त्यांच्याकडूनच दंड वसुली करण्यात आली आहे. मात्र जे विना तिकीट सटकले त्यांच्यामुळे बेस्टचे आर्थिक नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here